शुक्रवार, ७ जून, २०१९

आजन्म
आपली नाळ स्वतःच्या गावापासून
तुटतांना ती किती कष्टी होते.
दुस-या नाळेशी जुळतांना
सैरभैर होते, तुटते,पड़ते-झगड़ते, ठेचकाळते
तरिही ठेच लागलेला अंगठा लपवू पाहते
अनोळखी नजरेपासून.....
कारण तिला मायेच्या फुंकरीची शाश्वती नसते.
बरेच दिवस कायम उराशी बाळगून असते ती
एक अनोळखीपण.....
खरंतरं तीची नाळ जाणिवपूर्वक तोडली जाते
पण तरिही ती शांतपणे स्वःताची लढाई स्वताःशीच मात्र करत असते एकटीनेच........
तेव्हा अस्तित्वाच्या खूणा शोधत असते ती
जन्माच्या आधिपासूनच्या, आपल्याच पदरात
प्रत्येक पावलागणिक आशावते
पून्हा नव्याने उठून उभीही राहते....सतत
अश्वत्थामाही तिला रोज नव्याने तेल मागत येतो
तिच्या जखमेवर लावायचं राहून गेलेलं तेलंही ती
त्याला दानात देते. तरिही एक शापित दुस-या शापितेला हसतो.
कारण त्याला माहित असतं ही जखम न भरणारी आहे.....
पण, तरिही
तीला मात्र ती जखम मिरवायला नाही
आवडलं कधिचं......काल...आज...आणि उद्याही
हो... कारण तिचं बिच्चारेपण तिलाच नाही आवडलं कधिचं......
पण ती हरवलेल्या गावाची नाळ मात्र कायम
शोधत रहाते पावलागणिक
..आजपर्यंत कुठेच....कसलाच संदर्भ लागला नाही तिला अजून तरी........
शेवटी....थकून मनालाच समजावून सांगते ती एखाद्या बाळासारखी.....
आणि मग तिचं मनच त्या परक्या गावाशी आपली
नाळ जुळवून घेतं ....हसत...हसत
आजन्म....

©वर्षा पतके-थोटे
15-3-2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा